* Budget Special* - highlights in Marathi.

* Budget Special*_

▫ शेतकरी कल्याणासाठी आमचे सरकार कटिबद्ध, शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करणार

▫ मे 2014 मध्ये मोदी सरकार आल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेने चांगली कामगिरी केली. भारताची अर्थव्यवस्था आता जगातील सातवी मोठी 

▫ तिकीटांसह सर्व कागदपत्रे ऑनलाईन मिळत असल्याने डिजीटल इंडियाकडे कल

▫ 4 कोटी घरांना वीज पुरवण्याचं काम सध्या सुरु आहे

▫ ट्रेनच्या तिकिटांपासून ते इतर महत्त्वाची सगळी कागदपत्र ऑनलाईन उपलब्ध

▫ अर्थव्यवस्थेचा विकास दर 8 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची आशा

▫ 470 बाजार समित्या eNAM नेटवर्कने जोडल्या, उर्वरित मार्च 2018 पर्यंत जोडल्या जातील 

▫ फळांचे 3 लाख कोटींचे उत्पादन, 27.5 मिलियन टन अन्नधाऩ्याचे रेकॉर्ड उत्पादन

▫ गरिबांसाठी मोफत डायलेसिस सुविधा

▫ शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी योग्य सोई पुरवायला राज्यांबरोबर मिळून आम्ही काम करणार

▫ विशेष कृषी उत्पादन मॉडेल विकसित करण्याची गरज आहे 

▫ यावर्षी 27.5 मिलियन टन अन्नधांन्याचं उत्पादन घेण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं आहे

▫ 470 एपीएमसी बाजारपेठा इंटरनेटने जोडण्यात आल्या आहेत, 585 शेती मार्केटच्या सुधारणांसाठी 2 हजार कोटींची तरतूद

▫ बांबू शेतीसाठी 1290 कोटी रुपयांची योजना

▫ अन्न प्रक्रिया उद्योगासाठी 1400 कोटींची तरतूद करण्याचा सरकारचा निर्णय

▫ 100 बिलियन डॉलरचा शेतमाल सध्या निर्यात केला जातो. त्यासाठी 42 फूडपार्क उभारणार

▫ नाबार्डच्या माध्यमातून सूक्ष्म सिंचन सुरू आहे. त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे

▫ मत्स्य शेती आणि पशूसंवर्धन विकासासाठी 10 हजार कोटींची तरतूद

▫ सहा कोटींपेक्षा जास्त शौचालयं उभारण्यात आली, पुढील वर्षात 2 कोटी शौचालयं उभारण्याचा निर्धार

▫ इन्कम टॅक्स रचनेत कोणताही बदल नाही, अडीच लाख रुपये उत्पन्न करमुक्तच राहणार

▫ ज्येष्ठ नागरिकांना 50 हजार रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज

▫ मोबाइलवरील कस्टम ड्यूटी 15 टक्क्यांवरून वाढवून केली 20 टक्के, मोबाइल खरेदी महागणार

▫ राष्ट्रपतींचा पगार 5 लाख, उपराष्ट्रपतींचा पगार 4 लाख तर राज्यपालांचा पगार 3 लाख रूपये

▫ खासदारांचा पगार एप्रिल 2018मध्ये वाढणार, दर पाच वर्षांनी महागाई दराप्रमाणे पगार वाढेल

▫ पंतप्रधान आवास योजनेतंर्गत 1 कोटी पेक्षा जास्त घरे बांधली जात आहेत

▫ प्रधानमंत्री सौभाग्य योजनेतून 4 कोटी घरांना मोफत वीज कनेक्शन देण्याची योजना

▫ कृषी उत्पादन तयार करणाऱ्या 100 कोटींचं उत्पन्न असणाऱ्या कंपन्यांना टॅक्समध्ये 100 टक्के सवलत

▫ कृषी उत्पादक कंपन्या पहिल्या पाच वर्षांसाठी 100 टक्के करमुक्त

▫ क्रिप्टोकरन्सीला सरकार कायदेशीर समजत नाही

▫ रोखीने टोल देण्याची सिस्टम डिजिटल करणार

▫ मुद्रा योजनेमध्ये 76 टक्के लाभधारक महिला असून, 50 टक्के एससी, एसटी आणि ओबीसी आहेत, 3 लाख रुपये कर्ज वाटपाचे लक्ष्य

▫ स्टार्ट अप आणि उद्योग विकासासाठी मोदी सरकारचा नवा प्लान, नोटबंदीनंतर उद्योगांचं नुकसान भरून काढण्यासाठी लघुउद्योगांसाठी 3 हजार 700 कोटींची तरतूद

▫ नव्या कर्मचाऱ्यांना ईपीएफमध्ये सरकार 12 टक्के रक्कम देणार

▫ सर्व क्षेत्रातील नवीन कर्मचाऱ्यांचा 12 टक्के पीएफ सरकार भरणार

▫ महिला कर्मचाऱ्यांचा ईपीएफ 8 टक्के करण्याची शिफारस

▫ प्राईम मिनिस्टर फेलोशिप योजनेतून 1000 बी.टेक विद्यार्थ्यांची निवड होणार

▫ 10 कोटी गरीब कुटुंबांसाठी राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा योजना आणत आहोत, त्याचा 50 कोटी लोकांना लाभ मिळणार

▫ आदिवासी मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी 'एकलव्य स्कूल' उभारणार

▫ नॅशनल हेल्थ पॉलिसी अंतर्गत येणारी 1.5 लाख सेंटर्स लोकांच्या घराजवळ पोहोचवण्याचा प्रयत्न, हे सेंटर्स मोफत तपासणी आणि औषधं देणार, 12 हजार कोटी यासाठी मंजूर

▫ नमामी गंगा कार्यक्रमातंर्गत नदी स्वच्छतेच्या 187 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून, 16173 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

▫ टीबी रोखण्यासाठी 600 कोटी रुपयांची तरतूद

▫ 24 नवी मेडिकल कॉलेज देशभर उभारणार, 3 लोकसभा मतदान संघाच्या मागे एक मोठं हॉस्पिटल उभारणार

▫ राष्ट्रीय स्वास्थ विमा' योजना 1200 कोटी रूपये खर्च करून देशभर उभारणार

▫ प्रत्येक राज्यामध्ये किमान एक सरकारी वैद्यकीय महाविद्यालय असेल

▫ आरोग्यसुविधा सुधारण्यासाठी 'आयुषमान भारत' कार्यक्रम राबविण्याचा निर्णय

▫ आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील सेस 3 वरुन 4 टक्क्यांवर, एका टक्क्याची वाढ 

▫ शिक्षण आणि आरोग्यावरील सेस दर एका टक्क्यानं वाढणार

▫ शेअर बाजरातील शेअर्सच्या विक्री व्यवहारावर कर भरावा लागणार

▫ यावर्षी 8.27 कोटी लोकांनी कर भरला, गेल्या वर्षीच्या तुलनेत 19 लाख लोकांची वाढ

▫ 1 लाख ग्राम पंचायती ऑप्टीक फायबरने जोडण्याचे काम पूर्ण, ग्रामीण भागात 5 लाख वायफाय स्पॉट बनवण्यात आले आहेत

▫ तीन सरकारी विमा कंपन्यांचे विलिनीकरण करुन एकच कंपनी बनवणार

▫ सध्या 124 विमानतळे सेवेत, कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी उडान योजनेला बळ

▫ विमानतळांची संख्या 5 टक्क्यांनी वाढवणार, 900 नव्या विमानांची खरेदी करणार

▫ 25 हजारापेक्षा जास्त फुटबॉल असणाऱ्या रेल्वे स्थानकांवर एक्सलेटर बसवण्यात येणार, सर्व रेल्वे स्थानक आणि ट्रेनमध्ये वायफाय आणि सीसीटीव्ही बसवण्यात येणार 

▫ 11 हजार कोटी रूपये खर्चून मुंबईत 90 किमीच्या रेल्वे ट्रॅकच्या दुहेरीकरणाचं काम सुरू

▫ 18 हजार किलोमीटरच्या रेल्वेमार्गाचं दुहेरीकरण करण्याचं काम हाती, 3600 किमीचे ट्रॅक नव्याने बांधण्याचं काम हाती

▫ आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षेसाठी 1.38 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे, चालू आर्थिक वर्षात 1.22 लाख कोटींची तरतूद होती.

▫ रेल्वे सेवेच्या विकासासाठी वर्षात 1 लाख 48 हजार कोटींचा निधी खर्च करणार

▫ 600 रेल्वेस्थानकांचा विकास सुरु, विविध सोयी-सुविधा उपलब्ध होणार

▫ 9 हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचं सरकारचं लक्ष्य

▫ अमृत योजनेअंतर्गत 500 शहरांना शुद्ध पिण्याचं पाणी पोहचविण्याचे लक्ष्य

▫ 56 हजार कोटींचा निधी अनुसुचित जातींच्या विकासासाठी मंजूर तर अनुसुचित जमातींच्या विकासासाठी 39,135 कोटी रूपयांना निधी मंजूर

▫ यंदाच्या वर्षात 70 लाख रोजगार निर्मिती झाल्याचे स्वतंत्र सर्वेक्षणातून समोर

▫ प्री-नर्सरी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाचं धोरण एकच राहील याची काळजी घेणार

▫ शिक्षकांचा दर्जा सुधारला तर शिक्षणाचाही दर्जा सुधारेल, शिक्षकांना योग्य प्रशिक्षण देण्याकडे भर, 13 लाख शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम, डिजिटल शिक्षण देण्याची योजना

Comments